Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा २१

मानवी जीवनात पंचभूतात्मक देह असल्यामुळे आहार, निद्रादिक निसर्गतः आहेतच. पण विकसनशील बुद्धी म्हणजे ज्ञान, हे अधिक प्रमाणात त्याच्या वाट्यास आल्यामुळे भौतिक जीवनाबरोबर कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक व आध्यात्मिक असे त्याचे जीवन विस्तृत आहे. त्यातून त्याला गेलेच पाहिजे. हे जीवन सांभाळील तोच श्रेष्ठ मानव समजला जाईल. मानवावर निसर्गप्राप्त ही जबाबदारी आहे. कायदा, नीती, धर्म, समाज, अध्यात्म इत्यादि मानवी जीवनातच वापरली जाणारी मूल्ये आहेत. त्यांचा विसर त्यास पडणे म्हणजे त्याने आपले अमूल्य जीवन गमावले असे होईल..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment