Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ३१

क्रियेने चार गोष्टी असतात. उत्पत्ती, प्राप्ती, विकार, संस्कार ह्या त्या चार गोष्टी आहेत. जसे मृत्तिकेपासून घट उत्पन्न होतो. यास कुलाल क्रिया कारण आहे. एखाद्या माणसास चालण्याच्या क्रियेने एखाद्या ग्रामाची प्राप्ती होते. दुधाचे दही विरजवण्याच्या क्रियेने होते. बीजाचा वृक्ष पेरण्याच्या क्रियेने होतो. हा विकार होय. यानंतर संस्कार. त्यात वर्ग दोन, गुणाधान व दोषापनयन. एखाद्या वस्त्राला रंग देणे, भांड्याला कल्हई करणे किंवा अन्य धातूचा मुलामा देणे म्हणजे पूर्वी नसलेला नवा गुण (पण जो धारण करण्यास ती वस्तू समर्थ आहे तो) त्याचे ठिकाणी आणून ठेवणे हा गुणधानात्मक संस्कार होय. यास त्या त्या दृष्टीने योग्य अशी क्रिया कारण आहे..!! -सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment