Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा १७

प्रमाता म्हणजे जीव. त्यास शास्त्रीय भाषेत प्रमातृ चैतन्य असे म्हणतात. ज्या वेळी अंतःकरण चैतन्याच्या स्वरूपात आंतर्भूत होऊन वर्तमान व्यावर्तक होते, त्या वेळी ते विशेषण होते व चैतन्य विशेष्य होते. पण हा विशेषण-विशेष्य भाव कल्पित आहे, वास्तव नाही. वास्तव असता तर ज्ञानाने त्याचा बाध झाला नसता. ज्या वेळी जीव ज्ञानसंपन्न होतो त्यावेळी अंतःकरण, मन हेही आपले स्वरूप नव्हे, ते कारण आहे, कल्पित आहे, असे समजतो. प्रमातृत्व हा बंध आहे. वर लिहिल्याप्रमाणे जेव्हा त्या जीवास बोध होते, तेव्हा प्रमाता जीव या बंधनातून मुक्त होतो, त्या बरोबर कर्ता, भोक्ता, ज्ञाता या सर्व अज्ञान परिकल्पित भावना नष्ट होतात. म्हणून आत्मज्ञानानंतर कर्म नाही. 'तेथे स्वभावे धनंजया | नाही कोणीच क्रिया |' हीच कृतकृत्यता होय.. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment