मोक्ष म्हणजे आत्मस्वातंत्र्य, देहस्वातंत्र्य नव्हे. कारण देह हा काळ, कर्म, त्रिगुण इत्यादि अनेक पाशांनी बांधला आहे. तो त्यातून मुक्त होणार नाही. आत्मा हा स्वतंत्रच आहे. ते स्वातंत्र्य ज्ञानाने अनुभविणे म्हणजेच मोक्ष..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
प.पू.सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर - अध्यात्मिक विचारधारा
अध्यात्मिक विचारधारा या ग्रंथाचे सर्व हक्क प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्याकडे राखीव .
Tuesday, 4 October 2016
अध्यात्मिक विचारधारा ७६
अध्यात्मिक विचारधारा ७५
वेदान्तशास्त्रांत आत्मज्ञान होणे याचा अर्थ अज्ञान जाणे हाच अभिप्रेत आहे. कारण ज्ञान हे उत्पन्न होत नाही, ते स्वतः सिद्ध आहे. 'अगा ज्ञान पै आपुले |', 'अनादि जे मुक्तता | आपुली असे पंडुसुता |' ज्ञा.
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ७४
खरे पाहिले असता हा पिंजराही कल्पनेचाच आहे. तो मुळात नाहीच. जीव भ्रमाने आपण अडकलो असे समजतो. श्रीतुकाराममहाराज म्हणतात,
'शुक नळिकान्याये गुंतलासी काय | विचारूनि पाहे मोकळिया ||'
न कळतच जाळ्यात किंवा पिंजर्यात पशु पक्षी अडकतात. तसा जीवही न कळत या संसारपाशात अडकला आहे. 'पाहे गुंतलो नेणतां |' तु.म.
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ७३
पिंजर्यात शिरणे सोपे असते. पण त्यातून बाहेर पडणे कठीण. तसे संसारात शिरणे सोपे. खरे म्हणजे जीव मूळचा शिरलेलाच आहे. किंबहुना शिरला म्हणूनच त्यास जीव म्हटले जाते. तो बाहेर पडू शकत नाही. किंबहुना पडण्याची इच्छाही करीत नाही..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ७२
काही कुलपे लावण्यास किल्ली पाहिजे व काढण्यासही पाहिजे. पण काही कुलपे काढण्यासच किल्ली पाहिजे. ती अंगानेच लागतात. तसे अविद्या, अज्ञान हे अंगचे कुलूप आहे. ते लागलेलेच आहे. फक्त ते काढण्यास गुरुकृपेची किल्ली पाहिजे..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ७१
संसारात बुभुक्षू (भोगासक्त) वमुमुक्षु असे दोन प्रकारचे लोक आहेत. बुभूक्षूत दोन प्रकार आहेत. मुमुक्षुत्वयोग्य व मुमुक्षुत्व अयोग्य. ज्यांचे पूर्व संस्कार चांगले आहेत, ज्यांची सद्वासना आहे, ज्यांना सत्संग व सच्छास्त्र श्रवणाची आवड आहे, ते मुमुक्षुत्व योग्य होत. तसे नसते तर सर्वच मुमुक्षु झाले असते. मुमुक्षुतही दोन प्रकार आहेत.स्वतंत्र प्रज्ञ व परतंत्रप्रज्ञ. असंभावना, विपरित भावना ज्यांना बाधा करू शकत नाहीत, केवळ महावाक्यश्रवणानेच ज्यांना तत्काल बोध होत नाही. त्यांना श्रवण, मनन, निदिध्यासन किंवा योगध्यानादि साधनांचे अवलंबन करावे लागते, त्यांना परतंत्र म्हणतात..!! - सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
Thursday, 29 September 2016
अध्यात्मिक विचारधारा ७०
वेद त्रिकांडात्मक आहे, म्हणजे
वेद, कर्म, उपासना, ज्ञान सांगतो.
किंबहुना 'वेदु काय काय न बोले |' असे श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात. 'पण या सर्वांचे तात्पर्य साक्षात् वा परंपरेने परमात्मस्वरूपातच आहे. मात्र तो समन्वय कळणे कठीण आहे.'
'सर्वे वेदायत्पदमामनन्ति |' असे वेदच म्हणत आहे..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
Subscribe to:
Comments (Atom)