ज्ञान दोन प्रकारचे मानले जाते. ज्ञानापासून म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान व अज्ञानापासून उत्पन्न होणारे ज्ञान. उदा. रज्जूवर होणारे सर्पज्ञान हे रज्जूच्या अज्ञानापासून होणारे आहे, पण रज्जूचे यथार्थ ज्ञान ते ज्ञानापासून म्हणजे प्रमाणापासून होणारे आहे. तेच ज्ञान खरे व सफल होय.
ज्ञानकर्मसमुच्चय संसारात शक्य आहे, किंबहुना ज्ञानकर्मसमुच्चय म्हणजेच संसार. संसारातील ज्ञान व कर्म एकाच सत्तेतील असते. पण परमार्थात तो शक्य नाही. कारण ते ज्ञान कर्म उरू देत नाही. 'ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात्कुरुते तथा |' गीता..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment