Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा १९

जीवन हे दुःखमय का सुखमय ? असा प्रश्न कित्येकदा पडतो. विचार केला तर सुखमयता हाच जीवनाचा स्थायीभाव दिसून येतो. जीवाच्या अवस्था तीन. जाग्रत, स्वप्न व सुषुप्ति ! जाग्रतीत सुखही व दुःखही आहे, स्वप्नात सुख व दुःख आहे, पण सुषुप्तित केवळ सुख, मात्र ते आवरणासहित आहे. *मोक्षात निरावरण सुख असते. म्हणजे सुखाचा अन्वय (संबंध) सर्व अवस्थेत आहे. पण दुःखाचा अन्वय सर्व अवस्थेत नाही..!!* - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment