Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ०९

समुद्राचे मूल्य अनंत आहे, म्हणजे त्याचे मूल्य कोणी करू शकत नाही. पण तेच जर मर्यादित जागेत प्रवाहात थेंबाथेंबाने परिच्छिन्नदशेस आले की त्याचे तसे तसे न्यूनाधिक मूल्य निर्माण होते. तद्वत् जीवनाचे मूळ ब्रह्म, ते अनंत आहे. पण देह, इंद्रिये, मन, प्राणादिकात आत्मत्वाने परिच्छिन्न दशेला आले म्हणजे त्याचे मूल्य तसे तसे मर्यादित होते. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment