अध्यात्मिक विचारधारा ०७
प्रपंचाचाच परमार्थ करता येतो. पारा, गंधक, सोमल, ताम्र, लोह इत्यादि विषे आहेत. कुशल वैद्य त्याच्यावर नाना प्रकारचे संस्कार करून त्याचे उत्कृष्ट रसायन बनवितो व ते मारक न होता तारक होते. तसेच संसारातील दोष घालविले म्हणजे तोच परमार्थ होतो. मनबुद्धीतील विकार घालविले, त्यांच्यावर कर्म, भक्ति, ज्ञान, विवेक, वैराग्यादि साधनांचे संस्कार केले की तेच शुद्ध होते व परमार्थमय बनते. 'मन हे राम झाले |'
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment