सामान्यांना जग हे सत्य वाटणे स्वाभाविक आहे. मृगाने मृगजळाला भाळावे यात नवल काय ? वाटते तसे असतेच असे नाही. स्वप्नकाली स्वप्नातील वस्तू सत्यच वाटतात. पण त्या जागृतीत टिकत नाहीत. म्हणून त्यास सत्य म्हणता येत नाही. व्यवहारातही केवळ दिसण्यावरून कोणी त्यावर विश्वास ठेवत नाही, मग परमार्थात त्यास सत्य कसे मानावे ?
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment