Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा २०

संसार व परमार्थ या दोन्ही जीवनाच्या दोन बाजू आहेत. नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी वर येत नाहीत. एक वर तर दुसरी खाली असे असतेच. तसेच प्रपंचाची बाजू वर तर परमार्थाची बाजू खाली म्हणजेच झाकलेली राहणारच. जर परमार्थाची बाजू वर तर प्रपंचाची खाली झाकली जाणार..!!
संसारातून परमार्थाकडे जाता येते, पण खरा परमार्थ जर साधला असेल तर मात्र पुन्हा संसारात परत येता येत नाही. कारण संसारच राहत नाही. 'अवघाची संसार केला ब्रह्मरूप |' किंवा परत येणारा जीवच उरत नाही. 'तो जीव हे भाष सरे |' - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment