Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ५१

आकाशात विमान चालू शकते, पण स्थिर राहू शकत नाही. स्थिर राहण्याकरिता त्यास पृथ्वीचाच आश्रय करावा लागतो. तसे संसारात मन सतत भ्रमण करीत असते, पण स्थिर राहत नाही. ते परमात्मस्वरुपीच स्थिर राहील. 'तुका म्हणे चित्ता | वाट न व्हावा परता ||', 'अचळ न चळे ऐसे झाले मन | धरूनि निज खूण राहिलोंसे ||' - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment