Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा १२

वेदान्तशास्त्रात जीव अनादि मानला आहे. पण जीवत्व अनंत मानले नाही. अनादि ते अनंत असतेच असे नाही. एखाद्या घरात अंधकार शेकडो वर्षांचा जुना असला तरी दीप आणताच तो दूर पळतो, नव्हे प्रकाशमय बनून जातो. तद्वत अनादि अज्ञानामुळे चैतन्यास जीवदशा प्राप्त होते, ती आत्मज्ञान होताच नाहीशी होते, म्हणजे तो जीव ब्रह्मरूप होतो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment