खरे म्हटले तर कर्मही नवीन काही करीत नाही, तर ज्या वस्तूमध्ये जी निसर्गदत्त शक्ती आहे ती प्रगट करणे एवढेच त्याचे काम. मृत्तिकेत घटाकार धारण करण्याची शक्ती आहे म्हणजे घटरूपाने तिचा परिणाम होऊ शकतो, बीजाचा वृक्षरूपाने परिणाम होऊ शकतो. तो होण्याला निमित्तकर्त्यांची क्रियाही असते. ज्याचे ठिकाणी जे सामर्थ्य नाही ते कर्ता आपल्या क्रियेने निर्माण करू शकत नाही..!!
-सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment