Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा १५

लग्नसमारंभात वधुवरांवर अक्षता टाकण्याची पद्धत आहे.त्या टाकताना इतरांच्या अंगावरही पडतात.पण कोणी असे समजू नये की आमचे लग्न झाले.लग्न वधूवरांचेच होते.कारण , तेच तेथे अधिकारी आहेत.याप्रमाणे,संतांच्या उपदेशवचनांच्या अक्षता जरी सर्वांवर पडतात तरी 'तद्रूपतेसी सुलग्न' हे फक्त योग्य अधिका-याचेच लागते.इतरांकरिता तो उपदेश व्यर्थ जातो.

- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.


No comments:

Post a Comment