भ्रम, अज्ञान हे एकच होत.
भ्रमाचे प्रकार दोन. निश्चयात्मक, आणि संशयात्मक; निश्चयात्मक भ्रमाचे स्वरूप असे असते की असतो भ्रम, पण तो भ्रमत्वाने कळत नाही, तर ते यथार्थ ज्ञानच वाटते. रज्जूज्ञान होईपर्यंत सर्पज्ञान हे भ्रम आहे. असे न वाटता ते यथार्थच आहे असे वाटते. म्हणूनच पलायनादि क्रिया होतात. बद्धास जो भ्रम असतो तो निश्चयात्मय होय. अर्जुनाची अ. एक मधील भूमिका हीच होती. मुमुक्षुचा भ्रम गेलेला नसतो.
तो संशयात्मक असतो. त्याची निवृत्ति उपदेशाने होते. आपले काहीतरी कोठेतरी चुकते असे वाटणे हे संशयात्मक भ्रमाचे सामान्य स्वरूप होय..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment