Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ४४

कारले कडू असते हे प्रसिद्ध आहे. त्याची भाजी केली जाते. तीत पदरचा गूळ, चिंच, मसाला इत्यादि घालून त्यात गोडी आणली जाते. मात्र म्हणताना कारल्याची भाजी फार गोड झाली आहे असे म्हटले जाते. त्याप्रमाणे विषय हे तमोगुणाचे कार्य म्हणून स्वरूपाने दुःखरूपच आहेत. पण त्यात अज्ञानाने अनुकूल बुद्धी ठेवून स्वरूपानंद त्यांच्याद्वारा भोगला जातो. म्हणूनच श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, 'विषयाचें जें सुख | ते साद्यंतचि जाण दुःख | परी काय कीजे मूर्ख | न सेवितां न सरे ||' - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment